महाराष्ट्र वेदभुमी

खाडी चोरी झाली; भूमाफीयांचा "रात्रीस खेळ चाले"

 

मुंबई प्रतिनीधी:(सतिश पाटील):ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि दिवा परिसरात भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात खाडी किनारी आणि खारफुटी क्षेत्रांवर बेकायदेशीर भराव टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे... या प्रकारामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी गुप्तपणे माती आणि मलबा टाकून खाडी किनारी भाग भरला जात आहे... विशेषतः खारफुटी (मँग्रोव्ह) क्षेत्रांना लक्ष्य करण्यात येत असून, या संवेदनशील परिसंस्थेचे मोठे नुकसान होत आहे...

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे... खारफुटी ही किनारी भागाचे संरक्षण करणारी महत्त्वाची नैसर्गिक ढाल मानली जाते, त्यामुळे तिचे नुकसान होणे धोकादायक ठरू शकते...

दरम्यान, संबंधित प्रकरणाची दखल घेत महसूल आणि पर्यावरण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post