पत्रकार मयुर पालवणकर
श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच हालचाल नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे... रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत हा पन्नास वर्षे पूर्वी बांधलेला आहे. वडशेत व साखरी गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या काळात हा पूल बांधण्यात आला होता...
