महाराष्ट्र वेदभुमी

ध्येय निश्चित केले तर सर्व कार्य सिद्धीस जाते:-सिद्धी पवार


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर):  आज हिंदवी स्वराज्य अबाधित राहिले याचे कारण शिवसंभूचे विचार आपल्या सोबत आहेत... पण त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले...कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी माँ जिजाऊ साहेबांचा आशिर्वाद व त्यांची साथ होती... आज आपण २५ ते ३० वर्षाचे झालो तरी आपले ध्येय निश्चित नसते...परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माआधीच माँ जिजाऊ यांनी त्यांचे ध्येय निश्चित केले... यामुळे शिवाजी महाराजांनी हाती घेतलेले कार्य सिद्धीस गेले असे मत गोवे येथील शिवकन्या सिद्धी सतिश पवार यांनी ९ जुन रोजी रायगडावरील तिथी प्रमाणे झालेल्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानात व्यक्त केले...

    हिंदवी स्वराज्याची स्थापना व त्याचे रक्षण करण्याचा सुभारंभ रायरेश्वराच्या मंदिरात झाला... त्या दिवशी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याच दिवसापासून ते राज्यभिषकच्या सुवर्णा दिनापर्यंतचा प्रवास म्हणेज अंगावर शहारे आणणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊ माँ साहेबांचा आशिर्वाद आणि मोजक्या मावळ्यांची साथ... आपला जन्म रयतेसाठी झाला व आपण स्वराज्य स्थापन करू शकतो असा आत्मविश्वास शिवाजी महाराज यांनी प्रत्येकाच्या मनात मिळून दिला... वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराज यांनी मातृप्रेमाचा,बळीराजा सन्मान,स्त्री सन्मान यांचा इतिहास शिवाजी महाराज रचला...

    यावेळी शिवकन्या सिद्धी सतिश पवार हिचा कोकण कडा मित्र मंडळ अध्यक्ष सुरेश पवार,श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समित दुर्गेदुर्गेस्वर रायगडचे अध्यक्ष सिद्धेश मोरे, सदस्य पवन नगरकर यांच्या शुभेहस्ते सन्मान करण्यात आला....

Post a Comment

Previous Post Next Post