महाराष्ट्र वेदभुमी

करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनची पायाभरणी

उरण दि १६(विठ्ठल ममताबादे ): रेवस रेड्डी  महामार्गावरील महत्वाचा टप्पा  असणाऱ्या धरमतर खाडीवरील करंजा ते रेवस  सागरी सेतू च्या  पहिल्या फाऊंडेशनचा पायाभरणी समारंभ करंजा समुद्र किनाऱ्यावर संपन्न झाला... यावेळी MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिरुद्ध बोराडे तसेच Afcons  India pravet limited कंपनी चे श्री. पै साहेब, प्रोजेक्ट मॅनेजर श्री.कोरे साहेब श्री.सुभाष  साहेब, करंजा ग्रामस्थ मंडळा चे पदाधिकारी देवदास थळी,मेघनाथ थळी,विकास थळी,सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर, ग्रामस्थ आणि शेतकरी लक्ष्मण थळी,भालचंद्र थळी,हरेश्वर थळी, महेश थळी, धिरज थळी, मुकेश थळी, Afcons कंपनीचे अधिकारी, कर्मचारीवर्ग आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post