सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले... त्यांच्या निधनाने तळागाळाच्या माणसापासून ते सर्वे क्षेत्रातील दिग्गजांना धक्का बसला...
रामटेक शहरातील नागरिकांनी सूप्रसिद्ध उद्योगपती, "पद्यभूषण आणि पद्यविभूषण" या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित श्रद्धेय रतन टाटा यांना १० ऑक्टोबर ला सायंकाळी ७ वाजता गांधी चौक येथे श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. या वेळी एड. संजीव खंडेलवाल, दिपक गिरधर, अनिल वाघमारे, नत्थू घरजाडे, करीम मालाधरी, सृष्टी सौंदर्य परिवारचे ऋषि किंमतकर, अविनाश मोकदम, प्रा. आनंद राहाटे, अमोल गाडवे, अमोल खडोतकर, शेखर पारिल, संजय मुलमुले, वेदप्रकाश मोकदम, नितेश वानखेडे, भूषण देशमुख, श्रीनिवास रायडू, कांतेश हांडे, नंदेश शेळके सहित आदि उपस्थित होते. रतन टाटा यांच्या जाण्याने आपल्याच घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटले..
