महाराष्ट्र वेदभुमी

कालिदास दिन’ विदर्भसाहित्य संघाचे कविसंमेलन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य यांची व्याप्ती मोठी आहे... कुठे ‘यक्षाचं विरहगीत’, तर कुठे संस्कृत वाङ्मयाविषयी मार्गदर्शन, अशा पद्धतीने आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच कालिदास दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला... रामटेक रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला... विदर्भ साहित्य संघ, सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था आणि कँप्म चेरी फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले... सकाळी गांधी चौक ते कालिदास स्मारक हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ४ वाजता कालिदास स्मारक येथे आषाढ कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले... अध्यक्षस्थानी दीपक गिरधर तर कविसंमेलनात प्रा. डॉ. गिरीष सपाटे, रामचंद्र जोशी, माऊली इंगळकर, रमा गजभिये, इरपाचे, डॉ. सावन धर्मपूरीवार, संतोष ठकरेले, अरुण जाधव, डॉ गजेंद्र बरबटे, डॉ. आश्विनी बरबटे, नेतराम इंगळकर, माला रोकडे, मिनाज पैचातोड, जयश्री पांगारकर, ऋषिकेष किंमतकर, शुभाष चव्हान,अनिल दाणी, संजिवनी पाटील, आश्विनी मदनकर सचिन पाटील, राहुल सोमकुंवर, राकेश खलासणे सहित २२ कवि सहभागी झाले होते... कविनि कालिदास धरती माता, पाऊस शहित आदिवर कविता सादर केल्या. डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक तर संचालन  सचिन चव्हाण व जगदीश गुजरकर यांनी केले. आभार रविंद्र पाणतावने यांनी मानले...

कालिदास स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ते म्हणाले की संस्कृत क्षेत्रातील प्रतिभावंत साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली... कविकुलगुरू कालिदास साहित्यक्षेत्राचे मेरूमणी आहेत... कालिदास जगातील सर्वश्रेष्ठ कवि होते... त्यांचे जगविख्यात स्मारक रामटेकला आहे... परंतु येथे विजपूरवठा, सेकुरीटी व्यवस्था व स्वछता नाही... या दुराव्यवस्थे करिता त्यांनी प्रशासन व जनप्रतिनिधि यानां जबाबदार ठरविले...

इसवी सणाच्या चौथ्या शतकात महाकवि कालिदास होवून गेले...

महाकवि कालिदास हे उज्जैनच्या गुप्त दरबारातील नवरत्नांपैकी एक होते... गुप्त राजकुमारी प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक राजकुमार रुद्रसेन व्दितीय यांच्या सोबत झाला... रुद्रसेन अल्पायुषी ठरल्याने राज्यकारभाराची जबाबदारी प्रभावतीवर येवून पडली, तिला राज्यकारभाराचा अनुभव नसल्याने उज्जैनीवरुन काही अनुभवी लोकांना वाकाटक दरबारी राणी प्रभावतीच्या मदतीसाठी पाठविण्यात आले त्यातले कालिदास एक होते... नंदीवर्धन म्हणजेच आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी होती... वाकाटकांच्या राज्याचा विस्तार विदर्भ ते डेक्कन असा होता...

Post a Comment

Previous Post Next Post