महाराष्ट्र वेदभुमी

धान रोवणीसाठी पेंच कालव्याचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी


सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक : भात रोवणीसाठी पेंच कालव्यातून पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू झाला असून आतापर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १ जूनपासून आतापर्यंत ४० दिवसांत केवळ रामटेक तालुक्यात ३०५ मिमी पाऊस झाला आहे.  पारशिवनी, रामटेक, मौदा, कांद्री, भंडारा या तालुक्यांतील शेतकरी पेंच कालव्यावर अवलंबून आहेत. पेंच कालव्याद्वारे ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येते. सततच्या   जोरदार पावसाअभावी भात लावणी शक्य दिसत नाही.

पेंच कालव्याचे पाणी सोडल्यास शेतकरी भातलावणीचे काम सुरू करतील. भात लावणीचे काम महिनाभर अखंडपणे सुरू असते. भात रोवणीसाठी मजुरांची मोठी कमतरता आहे. लवकर पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना लागवडीची कामे सहज सुरू करता येतील. पेंच कालव्याचे पाणी १५ जुलैपासून सोडण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापति सचिन किरपान, माजी सभापती लक्ष्मण उमाळे व अनिल कोल्हे, शेतकरी दामोधर घरजाळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. तोतलाडोह, पेंच आणि खिंडसी जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे..

 जलाशयांची स्थिती:

विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोह धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ११६६ दलघमी आहे. अलीकडे तोतलाडोह जलाशयात ५३.५२  टक्के पाणीसाठा झाला आहे.  कामठी खैरी येथे ८० टक्के पाणीसाठा असून, त्याची एकूण साठवण क्षमता १८० दलघमी आहे. खिंडसी येथे ६०.४९  टक्के पाणीसाठा असून, त्याची एकूण पाणी साठवण क्षमता १०३ तलाव आहे. सुदैवाने जून २०२४  पूर्वी पाणीसाठा झाल्यामुळे तलाव भरलेले दिसत आहेत...

पेंच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजू भोमले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत १८ जुलै रोजी पानी वाटप संस्थाची बैठक बोलावली आहे... बैठकीत यावर विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो... अद्यापपर्यंत शेतकरी  करिता पाणी वाटप संस्थेने पाणी सोडण्याची मागणी केलेली नाही... गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा  पाणी साठा कमी  आहे. पाणी जपून वापरावे लागते...

Post a Comment

Previous Post Next Post