महाराष्ट्र वेदभुमी

ठाण्यातील विविध समस्यांसाठी विरोधी पक्षाचा पालिकेवर मोर्चा

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील): ठाणे महानगरपालिकेतिल सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे शहरातील विविध समस्यांचा व भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, घन कचरा, पाणी इ. विविध समस्यांबाबत जाब विचारला.

ठाणे : शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्च्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारला.

तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी शिष्ट मंडळाने केली. तसेच लाचप्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, राजन विचारे, खासदार: संजय दि.पाटील, विभाग प्रमुख: रमेश कोरगावकर, सुरेश पाटील युवासेना कार्यकारिणी सदस्या : कु.राजोल ताई पाटील , माजी नगरसेवक: संजय तरे,रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार:बबन पाटील, पत्रकार: सतिश पाटील,जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख-अनिष गाढवेसंह सर्व पदाधिकारी मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, तमाम शिवसैनिक,महाराष्ट्र सैनिक (महिला-पुरूष) व ठाणेकर हेही मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच, या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली..

Post a Comment

Previous Post Next Post