महाराष्ट्र वेदभुमी

भाजपाचे प्रतिक गोंधळी यांना चिरनेर गावातील तरुणांचा मोठा पाठींबा


उरण दि ३ प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)

निवडणुकीत राजकारणातील दोन मातब्बर घराणी आमने-सामने 

उरण तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या चिरनेर  ग्रामपंचायतीची  निवडणूक येत्या पाच नोव्हेंबरला होणार असून,या निवडणुकीत राजकारणातील दोन मातब्बर घराणी आमने-सामने आली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात शेकाप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले असून भारतीय जनता पार्टीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रतिक गोंधळी आणि त्यांच्या सहकारी सदस्य पदाच्या उमेदवारांना प्रचारात वाढता पाठिंबा मिळत आहे...

गावाच्या कामासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार- भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी

भारतीय जनता पार्टीने देशात नाविन्यपूर्ण योजना  राबविल्या आहेत...या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी, मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती तसेच सुशिक्षित तरुण वर्गाला गावाच्या विकासासाठी एकत्र आणून, योग्य नियोजन करून त्यांच्या माध्यमातून मला गावाच्या विकासाचे काम करायचे आहे... गरिबांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत...त्या गरजा पूर्णत्वास नेण्यास  मी नेहमीच  प्रयत्न करीन...त्यांच्याही काही अपेक्षा आहेत... त्या अपेक्षा पूर्ण करण्याची  ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भाजपने विकासाची कामे केली आहेत... भविष्यात समाजकार्याला अग्रक्रम देऊन, गावाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून, ग्रामपंचायत निवडणुकीतील माझे सहकारी उमेदवार रमेश फोफेरकर, सुशील पाटील, समीर डुंगीकर,रमेश गोंधळी, अजिंक्य ठाकूर, अंकित म्हात्रे, सिताराम कातकरी, प्रणोती पाटील, सरिता खारपाटील, अश्विनी कातकरी, मेघा चिर्लेकर, अश्विनी नारंगीकर, वनश्री खारपाटील या सर्वांना सोबत घेऊन गावाच्या चांगल्या कामासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post