विविध विषयावर झाली सकारात्मक चर्चा.
तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ व समानता व कंत्राटदार विरहित कामगार पद्धती करिता हरियाना पॅटर्न या दोन प्रमुख मागण्यांवर संघटना ठाम असून ठोस धोरणात्मक निर्णय तातडीने झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मांडली..
या पूर्वी मा.ना.ऊर्जामंत्री यांनी यापुर्वी अनेकदा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाकडून झाली नाही...प्रामुख्याने भरती मध्ये अनुभवी कामगारांना जादा मार्क, वयात सूट,विशेष आरक्षण, बँक अकाउंट द्वारे थेट खात्यात पैसे, कामगारांना मेडिक्लेम व अपघात विमा व भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई न होऊन कामावरून कमी केलेले कामगार कामावर न घेतल्याने कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली व याच मुळे संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागत असल्याचे महामंत्री सचिन मेंगाळे म्हणाले...
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून तातडीने मी स्वतः प्रशासना सोबत या सर्व विषया संबंधी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत मीटिंग आयोजित करून निश्चितच सकारात्मक तोडगा काढू, या कष्टकरी कामगारांना नाराज ठेवणार नाही असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले...
संघटनेचे च्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश,विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार,संघटनमंत्री उमेश आणेराव, उपमहामंत्री राहूल बोडके, सचिव अभिजीत माहुलकर, तात्या सावंत, जयेंद्र थुळ, संतोष कोल्हे, समीर हांडे, योगेश सायवनकर, कामगार संघाचे विठ्ठल भालेराव, दत्ता धामणकर उपस्थित होते...
भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश यांच्या हस्ते उपोषणाला बसलेल्या कामगारांना शित पेय देवुन उपोषण स्थगित करण्यात आले...