महाराष्ट्र वेदभुमी

फुशारक्यांची बोंब खांब पालदाड मार्गावर अपघात महीला गंभीर अपघातांची मालिका सुरूच, रस्ता होणार केवल


कोलाड (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातील खांब पालदाड मार्गावर आपघातांची मालिका सुरूच धानकान्हे देवकान्हे दरम्यान एक प्रवास करणारी महीला दुचाकीवरून घसरून पडल्याने घडल्याने आपघाताने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे तर खांब देवकान्हे पलदाड मार्गांवरील प्रवास हा देवेंदिवस धोकादायक असल्याचे दररोज होत असलेल्या आपघातातून दिसुन येत आहे त्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या या मार्गाच्या कामाला कधी मूहर्त लागेल तसेच गेली वर्षभर स्थानिक पुढारी तसेच नेतेगन म्हणतात मार्ग होईल हि अभिलाषा की फुशारक्या यातच संभ्रम .तर अत्यंत अरुंद असलेल्या आणि दुरवस्था झालेल्या या मार्गाला वाली कोण असा नागरिकांचा सवाल उपस्थीत होत आहे...

गेली कित्येक वर्ष रखडलेले काम आणि त्याच्या दुरुस्तीचा मांडला गेलेला खेळ त्यावर दुरूस्ती म्हणजे येथील नागरिकांची समज काढणे हेच आहे का असा सवाल उपस्थीत होत आहे कारण जेव्हा याची आठवण होते तेव्हां कोणीतरी ठेकेदार येतो मलमपट्टी करतो जातो मागील आठवड्यात देवकान्हे ते खांब दरम्यात कोणी ठेकेदार यांनी चक्क या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी सुरूवात केली एका दिवसात चार किलो मिटर अंतर रस्त्यावरील खड्डे भुजवले त्यात काही तसेच चार किलो डांबर अख्या रस्त्याला फासली त्यामुळे केवळ संबधीत अधिकारी अथवा ठेकेदार ही थट्टा तर करत नाहीत ना असा सवाल या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशी वर्गातून व्यक्त केला जात आहे...

देवकान्हे खांब या मार्गावरून खडतर प्रवासामुले दररोज आपघात घडत आहेत त्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या या मार्गाच्या कामाला जबाबदार कोण याला वाली कोण हा मार्ग जणू काही आता प्रवाशी नागरिक यांच्या जीवावर बेतू लागला आहे तसेच या मार्गावर दररोज होत असलेले किरकोळ आपघात एक ना एक दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याच जीवावर बेतू शकते असा संताप येथील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे तर कोणी तरी प्रवासी नागरिकाचा जीव गेल्यावरच या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळेल का अथवा त्याचे काम होईल का असे प्रश्र्न येथील नागरीकांना पडले आहेत त्यात या मर्गाबाबत तसेच त्याचा कामाबाबत अनेक लोक नेत्यांनी मोठ मोठ्या वल्गना केल्या तर काही म्हणतात मंजुरी मिळाली त्यात काहींनी सर्व्हे केला मात्र तो कुठे गेला हे मात्र गुलदस्त्यात आहे...

मुंबई गोवा महामार्ग तसेच कोलाड रोहा चणेरा राज्य मार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब पालदाड हा मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक म्हंटले तर काही वावग ठरणार नाही त्यामुळे गेली कीत्येक वर्षापासून या मार्गाचे दुरुस्तीचे काम रखडले आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना आपघाताला सामोरे जावे लागत आहे.त्यात अनेक खड्डे आणि अनेक धोकादाक वळणे अधिक मार्गाच्या दुतर्फा मार्गाला वाढलेली काटेरी झुडपे कुंमपन त्यामुळे एक दुसरी वाहन पास करण्यास मोठी तारेवरची कसरत तर मागील आठवड्यात एक महिला दुचाकी वरून प्रवास करताना खड्यातून घसरुन पडल्याने ती गंभिर जखमी झाल्याने  रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजले...

रायगडच्या राजकारणात गेली पंचवीस वर्ष कायम राज्य सरकारच्या मंत्री मंडळात येथील आमदारांचा मंत्री म्हणुन समावेश आहे हे नाकारता येत नाही मात्र शिवरायांच्या राजधानीच्या जिल्हयातील ग्रामीण भागातील जनता ही आजही काही मूलभूत सोयी सुविधांपासून तसेच विकासांपासून वंचित आहेत ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे हे नाकारता येत नाही कारण कोलाड खांब देवकान्हे धामणसई या भागात आजही नागरिकांना पुरेशा मूलभूत सोयी सुविधा नसल्याने दिसून येत आहे त्यात गेली वर्षभर या मार्गासाठी स्थानिक पुढारी नेते मंडळी एकटवली होती बैठका वर बैठका झाल्या परंतू त्यात निष्पन्न काय झाले हे गुलदस्त्याच तसेच काही अधिकारी येऊन खांब देवकान्हे या मार्गाची पाहणी करत कोणी  मोजणी केली तर मार्गाचे रुंदीकरण होत आहे यासाठी कोणी दुर्बीण सर्वे केला तर नंतर एकच बोंब सुरू झाली काहीची शेती जाईल गावातील घरे जातील रस्त्यालगत असलेले मंदिर जात आहेत हा मार्ग तीस ते बत्तीस फूट रुंद होणार या चर्चेला उधाण आले होते मात्र यावर कार्यतत्पर वरिष्ठ नेते मंडळी यांनी तसेच संबधीत खाते यांनी तद्नंतर कोणती भूमिका बजावली याचे ही गणित आजतागायत कोणाला कळले नाही त्यामुळे गुपित काय आहे की केवळ फुशारक्या मारत आहेत याची दखल घेणे गरजेचे आहे...

कित्येक निवडणुका आल्या गेल्या काहींनी जिंकल्या माञ त्याचे फलित काय तर तेथील नागरिकांच्या वाट्याला खड्यांचा प्रवास गेली अनेक वर्ष खांब पालदाड मार्गाचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम रखडले आहे याला जबाबदार कोण हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे त्यामुळे मार्गालगत नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे,बाहे, उडदवणे,ही गावे जोडली गेली आहेत त्यामुळे येथून शाळेतील विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग शेतकरी आणि रोहा कोलाड खांब येथे बाजार खरेदीसाठी जा ये करणारे नागरिकांचा मुळात हा एकमेव रहदारीचा मार्ग समजला जातो मात्र याच मार्गावरील देवकान्हे ते खांब मार्गाची तर अक्षरशः दैना अवस्था निर्माण झाली आहे तर एक वाहन आली तर दुसरी वाहन चालकाला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे गेली अनेक वर्षे या मार्गाची बोंब त्यात होत असलेले विचित्र आपघात या बाबत कोण ऐकणार हाच प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे...

अत्यंत अरुंद मार्गामुळे तसेच दोन वाहने समोरासमोर आल्याने होते बाचाबाची व हातघाई त्यामुळे अनेकदा मोठ मोठे वाद निर्माण झाले आहेत पंधरा वीस दिवसांपूर्वी मोठी हात झोंबी झाल्याचे समजले चार चाकी वाहन पुढे घे मागे घे कऱण्यात झाली धुमचक्री काढल्या काढल्या लाट्या काठ्या त्यात एकच हद्दीत असलेले भिडू एकमेकांसमोर भिडले आणि चार जणांनी दोन आदिवासी इस्माना बेदम चोप दिला तद्नंतर थेट कोलाड पोलिस स्टेशन गाठले ही वार्ता स्थानिक पुढारी यांच्या कानावर येताच जाऊन मिटवी केली आणि मामला थंड केला. परंतू याच मार्गाच्या कामासाठी अधिक स्थानिक पुढारी नेतेगण यांनी प्रयत्न केले असते तर कदाचित या मार्गाचे आजचे चित्र वेगळे असते.रायगड जिल्ह्यात अनेक ठिक ठिकाणी गल्लो गल्ली विकास कामे झाली रस्ते झाले मात्र जिल्हयात असा हा एकमेव मार्ग असावा की तो रखडला आहे अनेक नेते मंत्री यांनी आश्वासन दिले नारळ फोडली पाट्या देखील लावल्या मात्र हे काम अद्याप रखडलेले असल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे या मार्गाची दखल आतातरी पुढे येत असलेल्या निवडणुकीपूर्वी कोणी घेईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post